Free Prepaid Meter | मार्च महिन्यापासून ग्राहकांना लाईट बील येणार नाही आता घराघरात मोफत स्मार्ट प्रिपेड मीटर बसविण्यात येणार

Free Prepaid Meter : २०२४ मधील ह्या मार्च महिन्यापासून वीजेचा वापर करत असलेल्या ग्राहकांना लाईटबील येणार नाही.सरासरी बील अणि मीटर रीडिंगचा गोंधळ यातुन ग्राहकांची सुटका करण्यासाठी महावितरण कडुन एक नवीन योजना सुरू करण्यात आली आहे.

महावितरण कंपनीने सुरू केलेल्या ह्या नवीन योजनेमुळे ग्राहकांना आपल्या गरजेनुसार विजेचा वापर करता येईल अणि ग्राहकाने विजेचा जितका वापर केला आहे.तितकेच लाईटबील ग्राहकांना भरावे लागणार आहे. ह्या मार्च महिन्यापासून लाईटबील येणार नाही कारण महावितरण कंपनीच्या वतीने आता प्रत्येक घराघरात स्मार्ट प्रिपेड मीटर लावण्यात येणार आहेत. मीटरच्या रीडींग मध्ये होणारा गोंधळ ज्यामुळे येणारे अवाढव्य लाईटबील यावर उपाय म्हणून नव्याने प्रिपेड मीटर लावण्यात येणार आहेत. यासाठी ग्राहकांना पैसे देखील खर्च करण्याची आवश्यकता असणार नाही.कारण ह्या नवीन योजनेत जुन्या मीटरच्या जागी नवीन स्मार्ट मीटर मोफत आपल्या घरामध्ये लावण्यात येत आहेत.

आता घराघरात मोफत स्मार्ट प्रिपेड मीटर बसविण्या साठी

येथे क्लिक करून अर्ज करा

थकलेले लाईटबील ते वसूल करण्यासाठी महावितरण कंपनीकडुन केले जाणारे प्रयत्न अणि थकित लाईटबील न भरल्यास वीजेचे कनेक्शन काढुन घेण्याची महावितरण कंपनीकडून केली जाणारी कारवाई यामुळे महावितरण कंपनी अणि त्यांच्या ग्राहकांत वादविवाद होत होते. हे सर्व वादविवाद स्मार्ट प्रिपेड मीटर लावल्यानंतर संपुष्टात येतील. कारण ह्या योजनेअंतर्गत रिचार्ज केला तर घरात लाईट असेल ग्राहकांनी रिचार्ज नाही केला तर घरात लाईट राहणार नाही असे सोपे गणित वीजेचे असणार आहे. Free Prepaid Meter

यामुळे लाईटबील थकणार नाही अणि लाईट बील वसुलीची गरज देखील पडतार नाही.कारण प्रत्येक ग्राहक त्याच्या आवश्यकतेनुसार रिचार्ज करून वीजेचा वापर करेल. आज आपल्या नाशिक जिल्ह्यात मोठ्या वीज बिलाची थकबाकी असल्याचे आपणास दिसून येते.आज जवळपास अठरा हजार ग्राहकांचे २६५ कोटी इतके महावितरण कंपनीचे वीज बील थकलेले आहे. हे थकित लाईटबील वसुल करण्यासाठी महावितरण कंपनीच्या कर्मचारींना वेळोवेळी विशेष मोहीम हाती घ्यावी लागते.

पण आता घरात स्मार्ट प्रिपेड मीटर लावल्यामुळे हे वीजबिल थकबाकीचे प्रमाण शुन्यावर येण्यास मदत होईल असे महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

एल आयसीच्या ह्या खास योजनेत दरमहा 1800 रूपये गुंतवल्यास प्राप्त होणार 8 लाखांपर्यंतचे रिटर्न्स

Back to top button