Government Scheme

Yashwantrao Chavan Gharkul Yojana :यशवंतराव चव्हाण मुक्त घरकुल योजनेसाठी लवकरात लवकर अर्ज करा..

Yashwantrao Chavan Gharkul Yojanaवंचित जाती, भटक्या जमातीतील कुटुंबांचे जीवनमान उंचावण्यासाठी महाराष्ट्र राज्यात यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना सुरू करण्यात आली आहे. त्यांच्या उत्पन्नाचे स्त्रोत वाढविणे आणि त्यांना ग्रामीण भागात स्थैर्य देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. प्रत्येक जिल्ह्यात तीन वसाहती असून प्रत्येक वसाहतीत २० लाभार्थी आहेत. प्रत्येक वसाहतीला पाणीपुरवठा, वीजपुरवठा, मलनिस्सारण, सेप्टिक टँक, अंतर्गत रस्ते आदी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.

तीन हजार घरकुलांचा मार्ग मोकळा –

  1. यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंतर्गत असलेल्या घरकुलांचा मार्ग मोकळा झाला आहे. जिल्ह्यातील तीन हजार ७४ वैयक्तिक घरकुल लाभार्थ्यांना राज्य शासनाने कार्योत्तर मान्यता दिली आहे. घरकुलासाठी जिल्ह्याला ३८ कोटी ३६ लाख ३५ हजार दोनशे रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीपैकी यापूर्वी चार कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे.
  2. विमुक्त जाती, भटक्या जमाती प्रवर्गातील कुटुंबाचे राहणीमान उंचावणे, त्यांच्या उत्पन्नाचे स्त्रोत वाढवून त्यांना स्थिरता मिळावी, कुटुंबांना जमीन उपलब्ध करून देऊन त्यावर त्यांना घरे बांधून देणे व उर्वरित जागेवर लाभार्थी कुटुंबांना विविध शासकीय योजनांद्वारे स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाने यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना सुरू केली आहे. त्याअंतर्गत घरकुल बांधकामासाठी जिल्ह्यातील तीन हजार ૭૪ लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. या लाभार्थ्यांच्या घरकुलासाठी निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता दिल्याने अनेकांचे घराचे स्वप्न पूर्णत्वास येणार आहे. निधी मंजूर झाल्याने लाभार्थ्यांनाही मोठा दिलासा मिळाला आहे. यापूर्वी शासनाने चार कोटी रुपये दिले आहेत.
  3. उर्वरित निधीमधून घरकुल लाभार्थ्यांसाठी आता आठ कोटी ५९ लाख रुपये इतका निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.Yashwantrao Chavan Gharkul Yojana
  4. विमुक्त जाती, भटक्या जमाती प्रवर्गातील गोरगरीब, गरजूंसाठी घरकुलाची स्वतंत्र योजना नव्हती. त्यासाठी सरकारने योजना सुरू केली. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील गरजूंना घरकुल दिले जात आहे. जिल्ह्यासाठी घरकुलांची संख्या वाढविण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा सुरू आहे. -संजय राठोड, पालकमंत्री .

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेसाठी पात्रताYashwantrao Chavan Gharkul Yojana

  • लाभार्थी कुटुंबे वंचित जाती, भटक्या जमाती व आदिवासी प्रवर्गातील तसेच भटक्या भटक्या जमातीतील असावीत.
  • लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षा कमी असावे.
  • स्वत:चे घर नाही. झोपडी- कच्च्या घरात, पानांमध्ये राहात असावी. कुटुंब भूमिहीन असावे. महाराष्ट्राचा रहिवासी असावा. राज्यात कुठेही घरकूल योजनेचा लाभ घेऊ नये.
  • या योजनेचा लाभ कुटुंबातील एकाच व्यक्तीला मिळणार आहे.
  • लाभार्थ्यांनी वर्षातून किमान सहा महिने एकाच ठिकाणी वास्तव्य करावे.

लाडली बहना योजना आता महाराष्ट्रातही ?

या योजनेबद्दल जाणून घ्या सविस्तर !!

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत (घरकुल) योजना अर्ज कुठे करावा?

  • या योजनेअंतर्गत लाभास पात्र असलेल्या अर्जदारांनी आपल्या जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाची भेट घ्यावी.Yashwantrao Chavan Gharkul Yojana
  • आवश्यक कागदपत्रांची आणि या योजने संबंधित अधिक माहितीची चौकशी करावी आणि समाजकल्याण कार्यालयामध्ये अर्ज दाखल करावेत.

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत (घरकुल) योजनेचे लाभ

  1. या योजनेअंतर्गत निवड झालेल्या विमुक्त आणि भटक्या जमातीच्या कुटुंबास प्रत्येकी ५ गुंठे जमीन देऊन त्यांना २६९ चौरस फूट चे घर बांधून दिले जाते. उर्वरित जागेवर लाभार्थी कुटुंबास शासकीय योजनाद्वारे स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून दिली जाते.
  2. भूखंड कोणालाही हस्तांतरीत करता येणार नाही किंवा विकता येत नाही किंवा भाडेतत्वावर देता येणार नाही. प्रति वर्षी ३४ जिल्ह्यातील (मुंबई व बृहन्मुंबई वगळून) प्रत्येकी तीन गावे निवडून त्या गावातील कुटुंबांना या योजनेचा लाभ देण्यात येतो.
  3. झोपडीत राहणारे दारिद्र रेषेखालील कुटुंब ज्यांच्या घरात कमावणारा व्यक्ती नाही अशा विधवा अपंग, महिला आणि पूरग्रस्त कुटुंबे यांना या योजनेअंतर्गत प्राधान्याने निवड करून लाभ देण्यात येतो.

 

 शिधापत्रिकाधारकांसाठी मोठी बातमी, गहू-तांदळाच्या ऐवजी या ५ गोष्टी मिळणार!

 

विमुक्त जाती भटक्या जमातीसाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना

अ. क्र. योजना सविस्तर माहिती
1. योजनेचे नाव विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना.
2 योजनेचा प्रकार राज्यस्तरीय योजना
3 योजनेचा उद्देश. राज्यातील विमुक्त जाती व भटक्या जमाती या प्रवर्गातील कुटुंबांचे राहणीमान उंचावणे.राज्यातील विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील कुटुंबाचे उत्पन्नाचे स्त्रोत वाढवून त्यांना स्थिरता प्राप्त व्हावी यासाठी सहाय्य करणे.
4 योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव विमुक्त जाती व भटक्या जमाती .Yashwantrao Chavan Gharkul Yojana
5 योजनेच्या प्रमुख अटी लाभार्थी कुटूंब हे विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या मूळ प्रवर्गातील तसेच गावोगावी भटकंती करुन उपजिवीका करणारे असावे.लाभार्थी कुटूंबाचे वार्षिक उत्पन्न रु. 1 लक्ष पेक्षा कमी असावे.लाभार्थी कुटुंबाचे स्वत:चे मालकीचे घर नसावे.लाभार्थी कुटुंब हे झोपडी / कच्चे घर/ पालामध्ये राहणारे असावे.लाभार्थी कुटूंब हे भूमीहीन असावे.लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा अधिवासी असावा.लाभार्थी कुटुंबाने राज्यात कोठेही घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसावा.सदरहू योजनेचा लाभ पात्र कुटुंबातील एकाच व्यक्तीस देण्यात येतो.लाभार्थी वर्षभरात किमान 6 महिने एका ठिकाणी वास्तव्यास असावा.
6 दिल्या जाणा-या लाभाचे स्वरुप या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील निवड झालेल्या विजाभज कुटुंबास प्रत्येकी पाच गुंठे जमीन देवून त्यांना 269 चौ.फु.चे घर बांधून देणे. आणि उर्वरित जागेवर लाभार्थी कुटुंबास विविध शासकीय योजनांव्दारे स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करुन देणे. प्रतिवर्षी 34 जिल्हयातील (मुंबई व बृहन्मुंबई वगळून) प्रत्येकी 3 गावे निवडून त्या गावांतील 20 कुटुंबांना या योजनेचा लाभ देणे. पालात राहणारे, दारिद्रय रेषेखालील कुटुंब, घरात कोणीही कमावता नाही अशा विधवा परित्यक्ता किंवा अपंग महिला व पूरग्रस्त अशा कुटुंबाची प्राधान्याने निवड केली जाते. घर व भुखंड हे संयुक्तपणे पती पत्नीच्या नावे केले जाते. मात्र, विधवा व परित्यक्ता स्त्रियांच्या बाबतीत भूखंड व घर त्यांच्या नावेच केले जाते. भूखंड व घर कोणालाही हस्तांतर करता येत नाही व विकता येत नाही. तसेच सदरहू भूखंड अथवा घर भाडे तत्वावर सुध्दा देता येत नाही व पोटभाडेकरु सुध्दा ठेवता येत नाही. सदर योजनेच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली जिल्हा स्तरावर व उपविभागीय अधिकारी यांचे अध्यक्षतेखाली तालुका स्तरावर समिती निर्माण करण्यात आलेली आहे. त्यांनी शासकीय जमिनीची निवड करणे, शासकीय जमीन नसल्यास खाजगी जमीन निश्चित करुन खरेदी करणे, लाभार्थी निवड करणे, लेआऊट तयार करुन भूखंडावर घर बांधून देणे, पायाभुत सुविधा पुरविणे, विविध शासकीय योजनांव्दारे स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देणे इ. कामे करणे आवश्यक आहे.
7 अर्ज करण्याची पध्दत संबधित जिल्हयाचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांचेकडे अर्ज करणे.
8 योजनेची वर्गवारी सामाजिक
Yashwantrao Chavan Gharkul Yojana

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button