Gram In Rabi Season:शेतकऱ्यांनो रब्बी हंगामात हरभरा घाटी वरील आळी नियंत्रण कसे करायचे व त्यावरचे उपाय काय ते जाणून घ्या..
![Gram In Rabi Season](https://mishetkari.in/wp-content/uploads/2023/12/Add-a-heading-26-780x470.jpg)
Gram In Rabi Season जिल्ह्यातील रब्बी हंगामात बहुतांश शेतकऱ्यांनी हरभऱ्याची लागवड केली आहे. सध्या काही ठिकाणी हरभ-याला घाटे लागण्यास सुरुवात झाली आहे.त्यामुळे पाटे अळी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शेतक-यांनी एकात्मिक व्यवस्थापन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
हरभऱ्यावरील घाटेअळीची ओळख व नुकसानीचा प्रकार Gram In Rabi Season
हरभऱ्यावरील घाटे अळीचा मादी पतंग नवती च्या पानावर, कोवळ्या शेंड्यावर, कळ्यावर व फुलावर एक एक अशी एकेरी खसखशीच्या दाण्यासारखी अंडी घालतो. या अंड्यातून साधारणता दोन ते तीन दिवसात अळी बाहेर पडते. ही अळी सुरुवातीला पानावरील हरितद्रव्य खरडून खाते त्यामुळे पाने प्रथम पिवळसर पांढुरकी होऊन वाळतात व गळून पडतात. ह्या अळ्या थोड्या मोठ्या झाल्यावर हरभऱ्याची पूर्ण पाने कोवळी देठे खाऊन फस्त करतात. या किडीच्या तीव्र प्रादुर्भाव झाला असता झाडावर फक्त फांद्या शिल्लक राहतात. पुढे हरभऱ्याला फुले लागल्यावर व घाटे लागल्यावर ह्या अळ्या फुले व घाटे याचे नुकसान करतात. मोठ्या झालेल्या अळ्या घाट याला छिद्र करून आतील दाणे खाऊन घाटे पोखरतात. एक घाटेअळी संपूर्ण कालावधीत हरभऱ्यात ३० ते ४० घाट्याचे नुकसान करू शकते.
Gram In Rabi Season
हरभरा है रब्बी हंगामातील प्रमुख डाळवर्गीय पीक आहे. महाराष्ट्रामध्ये हरभन्याखालील क्षेत्र २०२१-२२ मध्ये २५.२७ लक्ष हेक्टर आणि उत्पादन २७.५७ लक्ष टन झाले आहे. सरासरी हेक्टरी उत्पादकता १०९२ किलो इतकी होती.
हरभरा पिकाच्या उत्पादनामध्ये घट होण्याचे मुख्य कारण म्हणजे घाटे अळी होय, साधारणपणे घाटेः अळीमुळे उत्पादनात ३० ते ४० टक्के घट होते.
त्यामुळे शेतकरी बांधवांनी जागरूक राहून किडींची ओळख करून पीक संरक्षण खर्चात बचत करण्यासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा कपर करणे अत्यंत गरजेचे आहे
भरा है रब्बी हंगामातील प्रमुख डाळवर्गीय पीक आहे. महाराष्ट्रामध्ये हरभन्याखालील क्षेत्र २०२१-२२ मध्ये २५.२७ लक्ष हेक्टर आणि उत्पादन २७.५७ लक्ष टन झाले आहे.
शंभर टक्के शासकीय अनुदानातून मिळवा मोफत 30 दिवसात निवासी
बांबू फर्निचर प्रशिक्षण..
घाटे अळी एकात्मिक व्यवस्थापन
Gram In Rabi Season
किडीचे कोष पक्षी वेढून खातात उन्हामुळेमरतात.उन्हाळ्यात खोल नांगरट करावी, त्यामुळेपिकाच्या फेर पालटीसाठी बाजरी, ज्वारी, मका किंवा भुईमूग या पिकांचा वापर करावा व मुख्य पिकाभोवती झेंडू या सापळा पिकाची लागवड करावी.
हरभरा पिकाच्या शेतामध्ये १५ ते २० पक्षी थांबे प्रति हेक्टरी या प्रमाणात लावावेत.हरभरा शेतामध्ये १० ते १२ कामगंध सापळे प्रति हेक्टर या प्रमाणात लावावेत.एक ते दोन अळ्या प्रति मीटर किवा ५ टक्के किडग्रस्त घाटे किंवा ८ ते १० पतंग प्रति कामगंध सापळ्यात दोन ते तीन दिवस आढळल्यास आर्थिक नुकसान पातळी समजून फवारणी करावी.
आता फक्त शंभर रुपयांमध्ये होणार तुमच्या जमिनीची रजिस्ट्री,
जाणून घ्या पूर्ण माहिती
घाटे अळी प्रमुख फवारणी
स्पिनोसेंड ४५ टक्के एस. सी. ४ मिली किया, इमामेक्टिन बेंजोएट ५ टक्के एस. जी. ३ ग्रॅम किंवा लॅबडा
Gram In Rabi Season
सायहॅलोथ्रीन ५ टक्के ई. सी. १२ मिली किंवा कोरंन्ट्रानिलीप्रोल १८.५० टक्के एस. सी. ३ मिली प्रति १० लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.