सरकारी योजना

पीएम किसान सम्मान निधी योजने विषयी माहीती Pm Kisan Samman Nidhi Yojana Information in Marathi

शेती हा व्यवसाय आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो.अणि आपल्या भारत देशातील सर्व शेतकरी बांधव आपले अन्नदाता आहेत.शेतकरी बांधवांच्या मेहनतीमुळेच आज आपण दोन घास सुखाचे खातो आहे.म्हणुन शेतकरी बांधवांच्या हितासाठी आपले महाराष्ट्र सरकार नेहमी वेगवेगळ्या योजना राबवत असते.जेणेकरून शेतकरी बांधवांना आर्थिक साहाय्य प्राप्त होईल.आजच्या लेखात आपण शासनाने शेतकरी बांधवांसाठी सुरू केलेल्या एका लाभदायक योजनेविषयी माहीती जाणुन घेणार आहोत.जिचे नाव पीएम किसान सम्मान निधी योजना असे आहे.

पीएम किसान सम्मान निधी योजना काय आहे? योजनेची वैशिष्ट्ये काय आहेत?

  1. किसान सम्मान निधी ही संपुर्णपणे केंद्र सरकारच्या दवारे चालवली जाणारी एक महत्वाची योजना आहे.हया योजनेसाठी जो काही निधी प्राप्त होतो तो निधी केंद्र सरकारकडुन दिला जातो.
  2. जिच्याअंतर्गत शेतकरी बांधवांना दरवर्षी सहा हजार रुपये इतकी आर्थिक मदत केली जाते.
  3. पीएम किसान सम्मान निधी योजना ही भारत सरकारच्या वतीने १ डिसेंबर २०१८ रोजी सुरू करण्यात आली होती.
  4. किसान सम्मान निधी योजनेअंतर्गत सर्व जमीनधारक शेतकरी कुटुंबांना तीन समान हप्त्यांमध्ये दरवर्षी सहा हजार रुपये वितरित केले जातात.म्हणजे दर चार महिन्यांनी शेतकरींच्या खात्यात दोन हजार रूपये जमा केले जातात.
  5. पैसे प्राप्त करण्यासाठी शेतकरयांना वर्षभर वाट पाहावी लागु नये यासाठी दोन दोन हजार रूपयांचे तीन हप्ते शेतकरयांच्या खात्यावर वर्षभरात जमा केले जातात.
  6. म्हणजे ज्या कुटुंबात पती पत्नी अणि अठरा वर्षांच्या खालील अल्पवयीन मुले आहेत अशा कुटुंबियांना ह्या योजनेसाठी पात्र ठरवले जाते अणि त्यांना ह्या योजनेअंतर्गत निधीचा वाटप केला जातो.
  7. ह्या योजनेअंतर्गत दिला जाणारा निधी थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या बॅक खात्यामध्ये जमा केला जातो.
  8. पीएम किसान सम्मान निधी योजना ही केंद्र सरकारद्वारे राबवली जाणारी योजना आहे.
  9. पण राज्य सरकार तसेच केंद्र शासित प्रदेश प्रशासनाकडुन संबंधित व्यक्तींची पात्रता ह्या योजनेसाठी निश्चित केली जाते.
  10. ज्या शेतकऱ्यांकडे दोन हेक्टर जमीन होती किंवा त्यापेक्षा कमी जमीन होती अशाच शेतकरींना आधी पात्र ठरवले जात होते.
  11. पण आता सरकारने निर्णय घेतला आहे की जमीन कितीही असो पण इतर निकषांत शेतकरी बसत असेल तर त्यांना ह्या योजनेसाठी पात्र मानले जाईल.

पीएम किसान योजनेचे मुख्य उद्दिष्ट काय आहे?

  1. पीएम किसान योजनेद्वारे आर्थिक साहाय्य प्रदान करून अन्नदाता शेतकरी बांधवांच्या उत्पन्नात वाढ केली जाणार आहे.
  2. ज्या शेतकरी बांधवांकडे शेतीचे महत्वाचे काम करण्यासाठी वेळेवर पैसे उपलब्ध नसतात.
  3. अशा गरजु शेतकरी बांधवांना  शेतीच्या कामासाठी आर्थिक मदत प्राप्त करून देण्यासाठी सरकारने ही योजना सुरू केली आहे.

पीएम किसान सम्मान निधी योजनेसाठी लागणारी पात्रता काय आहे? ह्या योजनेसाठी पात्रतेच्या अटी कोणकोणत्या आहेत?

अशी कुठलीही संस्था जिच्या नावावर शेतजमीन आहे ती ह्या योजनेसाठी अपात्र ठरणार आहे.कारण ही योजना शासनाने कुठल्याही संस्थेसाठी नव्हे तर फक्त गरजु शेतकरी बांधवांसाठी सुरू केलेली आहे.

पीएम किसान सम्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी कोण अपात्र ठरते?

  1. जे शेतकरी व्यक्ती संविधानिक पदावर आहेत असलेले माजी किंवा विद्यमान पदाधिकारी म्हणजेच राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान सरन्यायाधीश इत्यादी व्यक्ती ह्या योजनेसाठी अपात्र ठरणार आहेत.
  2. याचसोबत शेतकरी असलेले माजी किंवा विद्यमान खासदार, मंत्री, आमदार, राज्यमंत्री,जिल्हा पंचायत अध्यक्ष, महापौर इत्यादी देखील ह्या योजनेसाठी अपात्र ठरणार आहेत.
  3. सर्व प्रकारचे स्थानिक स्वराज्य संस्थेतील कर्मचारी तसेच सरकारी कर्मचारी देखील ह्या योजनेसाठी अपात्र ठरतील.
  4. पण सरकारी नोकरीत असलेल्या मल्टीटास्किंग स्टाफ,चतुर्थ श्रेणी कर्मचारी तसेच सहायक कर्मचारींना ह्या योजनेसाठी अर्ज करता येणार आहे.
  5. असे व्यक्ती जे सेवानिवृत्त झाले आहेत आणि त्यांना महिन्याला दहा हजार पेक्षा जास्त पेंशन मिळते ते देखील ह्या योजनेसाठी अपात्र ठरणार आहेत. पण यात चतुर्थ श्रेणी कर्मचारी तसेच सहायक कर्मचारींना त्यांचे पेंशन दहा हजार पेक्षा जास्त असले तरी देखील योजनेसाठी अर्ज करता येणार आहे.
  6. ज्या व्यक्तींनी मागील वर्षी कर भरला आहे असे करदाते देखील ह्या योजनेसाठी अपात्र ठरतील.
  7. इंजिनीअर,डाॅक्टर,सीए,वकिल वास्तुविशारद इत्यादींना देखील ह्या योजनेतून वगळण्यात आले आहे.

पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे कोणकोणती आहेत?

योजनेचा लाभ प्राप्त करण्यासाठी आपल्याकडे खालील दिलेली महत्वाची कागदपत्रे आपल्याकडे असणे आवश्यक आहे –

  • आधार कार्ड 
  • बॅक खाते पासबुक
  • जमिनीचा सातबारा तसेच आठ अ उतारा
  • आपले आधार कार्ड आपल्या बॅक खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे.
  • आपला मोबाईल नंबर देखील आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे.

पीएम किसान योजनेसाठी नावनोंदणी कशी करायची?

येथे करा अर्ज

  1. पीएम किसान योजनेसाठी आपले रेजिस्ट्रेशन करण्यासाठी तलाठी कार्यालयात आपली सर्व आवश्यक कागदपत्रे घेऊन जाऊ शकतो.
  2. किंवा एखाद्या सीएससी सेंटर वरून देखील आपणास कागदपत्रे घेऊन जाऊन आॅनलाईन पदधतीने रेजिस्ट्रेशन करता येईल फक्त त्यासाठी आपल्याला काही शुल्क आकारले जाईल.
  3. आपण पीएम किसान योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन देखील स्वता आपली नावनोंदणी करू शकतो.

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना विषयी माहिती Namo Shetkari Sanman Nidhi Yojana information in Marathi

पीएम किसान सम्मान निधी योजनेचा लाभ किती शेतकरयांना होणार आहे?

योजनेचा लाभ बारा करोड पेक्षा अधिक गरजु शेतकरी बांधवांना प्राप्त होणार आहे.

  1. पीएम किसान सम्मान निधी योजनेअंतर्गत प्राप्त झालेल्या पैशांमध्ये शेतकरी शेतीसाठी आवश्यक कुठलेही साहित्य खरेदी करू शकतात.
  2. आतापर्यंत एक लाख साठ करोड पेक्षा अधिक रक्कम ह्या योजनेअंतर्गत शेतकरयांना देण्यात आली आहे.
  3. सुरूवातीला फक्त छोट्या अणि श्रीमंत शेतकरींना ह्या योजनेत समाविष्ट करण्यात आले होते.
  4. पण आता सर्व शेतकऱ्यांना ह्या योजनेत समाविष्ट करण्यात आले आहे.पण ज्या शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती मजबुत आहे. त्यांना ह्या योजनेसाठी पात्र मानले जाणार नाही.
  5. पीएम किसान योजनेसाठी अपात्र ठरणारया व्यक्तींना दोन श्रेणीमध्ये विभागण्यात आले आहे.
  6. पहिल्या श्रेणीमध्ये सर्व संस्थागत जमिनधारक आहेत.
  7. अणि दुसरया श्रेणीत एकुण सहा प्रकारच्या शेतकरी कुटुंबांना समाविष्ट करण्यात आले आहे.
  8. पीएम किसान सन्मान  निधी योजनेची घोषणा २०१९ मध्ये सर्वसामान्य बजेट दरम्यान करण्यात आली होती.
  9. अणि २४ फेब्रुवारी रोजी ही योजना लाॅच करण्यात आली होती.

पीएम किसान योजनेचा पहिला हप्ता कधी जारी करण्यात आला होता?

पीएम किसान योजनेचा पहिला हप्ता १ फेब्रुवारी २०१९ मध्ये जारी करण्यात आला होता.आतापर्यत ह्या योजनेचे ९ हप्ते शेतकरींना प्राप्त झाले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button